Tuesday, 2 October 2018

महात्मा गांधीचा शिक्षण विचार --- नयी तालीम
*********************************************
***********************************
‘आपण जगाला व देशाला देत असलेली सर्वोत्तम देणगी ’ असे महात्मा गांधींनी ज्याचे वर्णन केले त्या ‘नयी तालीम’ शिक्षणपद्धतीची गांधीजयंतीनिमित्त चर्चा करायला हवी.सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी नयी तालीम हे साधन आहे अशी गांधींची भूमिका होती.दुर्दैवाने शासनाने गांधीची ही शिक्षणपद्धती स्वीकारली नाही अन्यथा आज भारत एका वेगळेच राष्ट्र बनले असते.आज बेकारीचा प्रश्न गंभीर झाला आहे.कौशल्याधारीत शिक्षण मिळत नाही. गरिबांविषयीची कणव वेगाने हरवते आहे अशावेळी गांधीच्या शिक्षणपद्धतीची तीव्रतेने आठवण येते .
.दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींनी तेथील आश्रमात असणार्या मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धती वापरली होती. त्यातून त्यांचे चिंतन विकसित झाले. १९३७ साली कॉंग्रेस सरकारे स्थापन झाल्यावर वर्धा येथे शिक्षण समेलनात गांधींनी बुनियादी शिक्षणाची अत्यंत सविस्तर मांडणी केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रविंद्रनाथ टागोरांसोबत काम केलेले आर्यनायकम पती पत्नींनी शाळेची जबाबदारी घेतली . त्यानुसार वर्धा व भारतात बिहार,ओरिसा,आंध
्र,तामिळनाडू काश्मीर अनेक राज्यात शाळा सुरू झाल्या.१९५६ साली २९ राज्यात ४८००० नयी तालीम पद्धतीच्या शाळा होत्या आणि त्यात ५० लाख मुले शिकत होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर गांधींच्या शिक्षणविचाराचा प्रसार झाला होता. परंतु शासनाने हा शिक्षणविचार आधार मानून शिक्षण रचना न केल्याने या शाळा बंद पडत गेल्या व आज केवळ भारतात केवळ ५०० शाळा सुरू आहेत.
गांधींनी ‘नयी तालीम’ची प्रमुख ४ तत्वे मांडली. १)प्राथमिक शिक्षण हे ७ ते १४ वयोगटाचे असेल २)शिकविण्यासाठी निवडलेला हस्तोद्योग हा परिसरातील लोकांच्या मुख्य व्यवसायातील असावा ३)सर्व विषयांचे शिक्षण निवडलेल्या हस्तोद्योगाशी अनुबंध साधून दिले जावे ४) असे दिले जाणारे शिक्षण उत्पादक व स्वावलंबी असावे.याबरोबरच शिक्षण हे मातृभाषेतून दिले जावे अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. शाळेत इतिहास,भूगोल,गणित,भाषा,चित्रकल
ा,संगीत,स्वास्थ,समाजशास्त्र हे विषय होते पण हे सर्व विषय उद्योगांच्या आधारे शिकवले जात.चित्रकला,सं
गीत व लोकनृत्य हे ही विषय होते. प्राथमिक शिक्षणात सफाई, आरोग्य व आहारशास्त्र यांचा समावेश त्यांनी केला. सफाईकडे गांधी जीवनाकडे बघण्याची सौदर्यदृष्टी निर्माण करणारी कृती अशा नजरेने बघत.सफाई करताना मुलांच्या मनात अशी कामे करणार्याविषयी तिरस्काराची भावना न निर्माण होता समान भाव निर्माण होईल. त्याचप्रमाणे आहारशास्त्रानेही स्वयंपाक केवळ महिलांचे काम वाटणार नाही. त्यातील विज्ञानही नकळत मुलांना कळेल.नयी तालीम म्हणजे मुलांना व्यवसायशिक्षण इतका संकुचित अर्थ नाही तर त्या उद्योगाच्या माध्यमातून गांधींना शिक्षण द्यावे असे अपेक्षित होते.वस्त्रोद्योग शिकवताना टकळी,धागा यातील भूमिती,कापसाच्या निर्मितीतील विज्ञान,वस्त्रन
िर्मितीतील अर्थकारणातील अर्थशास्त्र व गणित,वस्त्र निर्माण करणार्या गरिबांच्या जीवनाचा परिचय करून देणारा भूगोल असे अनेक विषय शिकवावेत असे गांधींना अपेक्षित होते. या शिक्षणातून उच्च नीच भाव नसलेला,शहर व खेडी नसलेला बुद्धीचे काम व श्रमाचे काम यात फारकत न करणारा समाज निर्माण होईल अशी गांधींची दृष्टी होती. इतिहास,भूगोल,ना
गरिक्षास्त्र या विषयाचा मुलांच्या वास्तवाशी संबंध जोडला गेला पाहिजे असा बापूंचा आग्रह होता.
शिक्षणतज्ञ कृष्णकुमार म्हणतात “भारतीय समाजातील द्बलेल्या समाजघटकांनी विकसित केलेल्या आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या ज्ञानव्यवस्थांन
ा शिक्षणात महत्वाचे स्थान देण्याचा प्रयत्न गांधी करत होते” शिक्षक प्रशिक्षणावर ही त्यांचा भर होता. शिक्षक व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास व्हावा म्हणून प्रशिक्षणात संगीत,क्ला,सणउत्सव यांचा समावेश असावा असे ते म्हणत.
आज जेनेटिक सायन्स व मेंदूआधारित शिक्षणातून हे सिद्ध होते आहे की अंनुभवातून दिल्या जाणार्या शिक्षणातून मेंदूचा विकास अधिक चांगला होतो व सर्वांगिण शिक्षण दिले जाते.गांधींनी ही मांडणी हे संशोधन झालेले नसताना ८० वर्षापूर्वी केली होती हे त्यांचे द्रष्टेपण होते.
आजही शिक्षणाचे स्वरूप गरीब- श्रीमंत यांच्यात भेद अधिकाधिक वाढवणारे, समान शिक्षण नाकारणारे, शिक्षणाचा व्यापार वाढविणारे असेच आहे. पुस्तकी शिक्षणावर भर, वाढणारी व्यक्तीकेंद्रीतता, वाढती उपभोगप्रधानता व त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय प्रश्न, श्रमाकडे व श्रमकर्त्याकडे बघण्याची अधिक तीव्र झालेली नकारात्मक दृष्टी हे बघता नई तालिम शिक्षणपद्धती हेच उत्तर वाटते. ग्लोबल वॉर्मिंग च्या पार्श्वभूमीवर विकासाच्या धारणेबाबत आपणां सर्वांनाच पुनर्विचार करणे आवश्यक असेल. गांधीजीनी मांडलेला पर्यावरणस्नेही शिक्षणविचार म्हणून अधिकच प्रासंगिक झालेला दिसतो.
या शिक्षणातून परिसराशी जुळून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचे शहरी ग्रामीण दुभंगलेपण आले नसते.आज बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ आणि कष्ट करणारा कमी दर्जाचा व त्याआधारे दिला जाणारा पगार अशी भांजणी झाली आहे ती यातून कमी झाली असती.नव्या शैक्षणिक धोरणात नयी तालिम स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
नयी तालिम ची पुन्हा सुरुवात ------आनंदनिकेतन
वर्धा येथील आश्रमात नयी तालिम ची शाळा १९७० च्या दशकात जिथे बंद पडली तिथेच नयी तालिम शाळा २००५ पासून पुन्हा सुरू करण्यात आली. सर्वोदयी अभ्यासक कार्यकर्त्या सुषमा शर्मा या संचालक आहेत. विद्यार्थी संख्या २४० आहे.सर्व सामाजिक गटांचे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व आहे की नाही याकडे लक्ष असते.
प्रिती, मुक्ती आणि अभिव्यक्ती. विद्यालयातील शिक्षक-विद्यार्थी संबंधांचा हे आधार आहेत. इयत्ता सातवीपर्यंत बागकाम व शेती, स्वयंपाक, वस्त्रकला या सारख्या कामांचा समावेश आम्ही केला आहे भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रेया सारख्या विषयांच्या अध्ययनासह मुले वस्त्र विणतात. कला,संगीत यावर विशेष भर आहे. सामाजिक विषयांवर सतत बोलले जाते व समाजदर्शनाच्या क्षेत्रभेटी केल्या जातात. इयत्ता सातवीपर्यंत विविध भाज्या व कापूस, मूग, तुरी, बाजरी, ज्वारी, मका यांचा पावसाळी लागवडीचा तर व मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू या सारख्या हिवाळी भाज्यांची लागवड करायला व देखभाल करायला शिकतात. हे काम करीत असताना जमिनीचे मोजमाप क्षेत्रफळ व परिमिती काढणे, बागेचा नकाशा स्केलनुसार काढणे, जमिनीवर भौमितिक आकृत्यांचा उपयोग करीत बागेची रचना करणेइ. गोष्टी मुले शिकली. विविध ऋतुंमधील किमान-कमाल तापमान, आर्द्रता, विहिरीतील पाण्याची पातळी यांचे मोजमाप, नोंदी ठेवणे, आलेख काढणे हे सहज शिकता येते . गांडूळ खत तयार करणे, कंपोस्टखत तयार करणे, द्रवरूप झटपट खत करणे, कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क तयार करून फवारणी करणे, मित्र कीड, नुकसान करणाऱ्या किडींची तोंडओळख होणे, मधमाशा व कीटकांचे निसर्गातील महत्त्वाचे स्थान समजून घेणे, अहिंसक पद्धतीने मध काढण्याच्या पद्धतींचा परिचय होणे,अळीम्बीची शेती करायला शिकली. महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची प्रत्येक मुलास संधी मिळते ज्यातून पाकशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छतेचे शास्त्र धडे घेत असतानाच स्वावलंबन व लिंगसमभावाचे मह्त्त्व रुजण्यास अनुकूल वातावरण बनवणे शक्य होते. आज शिक्षणशास्त्रात ज्ञानरचनावादात ज्यात शिकविण्यापेक्षा शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी व टिकावू मानलेली आहे नयी तालीम ज्ञानरचनावादाशी जवळीक साधणारी, विद्यार्थ्याचा सक्रीय सहभाग घेत, जीवनकौशल्ये विकसित करीत त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी आहे.शिक्षकांनी पालकांनी ही शाळा बघायला हवी
---------------------------------------------------------------------------
-----
नयी तालिम शाळेचे विद्यार्थी डॉक्टर अभय बंग
डॉक्टर अभय बंग हे सेवाग्राम आश्रमात असलेल्या नय तालीमचे विद्यार्थी होते. त्यांच्याकडून ही पद्धती समजून घेतली . ते म्हणाले की शेतकरी मजूर कसे जगतात याचा विद्यार्थीदशेत अनुभव देणारी ही पद्धती होती.दिवसभरात ३ तास उत्पादक काम करणे सक्तीचे होते. सुतकताई,विणकाम,गोशाळेची स्वस्छता,शौचालय सफाई,स्वयंपाकगृहात काम,भांडी घासणे ही कामे प्रत्येक करत होता.आश्रमात आलेल्या परदेशी पाहुण्याची मुले मुलाखत घेत. स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास खुद्द स्वातंत्रसैनिक येवून समजून देत. आकाशातले तारे दाखविले जात तर कधी झाडावर चढून कवितेचे पुस्तक आम्ही वाचत होतो. कालपेक्षा तू आज पुढे सरकलास का ? असा महात्मा गांधींचा दृष्टीकोन परीक्षेत होता. प्रात्याक्षिक परीक्षेत ‘स्वयंपाक करून दाखव’ ‘हा वाफा दिला तर त्यात नियोजन कसे कराल?’ असे प्रश्न विचारत..स्वयंपाकात भांडी घासण्यापर्यंत कामे करावी लागायची.. जीवशास्त्राचे शिक्षक आम्हाला परिसरात फिरायला नेत व झाडांविषयी प्रश्न विचारत व त्यावरून विद्यार्थ्यांचे आकलन तपासत...
टॉलस्टॉय च्या इव्हान द फूल या कथेत एक आंधळी म्हातारी ज्यांच्या हातावर कष्ट करून घट्टे पडले नाहीत त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवते .मला वाटते ही मूल्यव्यवस्था शिक्षणात आणायला हवी.’नयी तालीम’ला केवळ व्यावसायिक शिक्षण म्हणणे मला योग्य वाटत नाही कारण शाळेत मी केवळ शेती शिकलो नाही तर शेतकर्याचा सन्मान करायला शिकलो .त्यामुळे ती जीवनदृष्टी आहे.
---------------------------------------------------------------------------
---
नयी तालिम कडे आकर्षण वाढते आहे --- डॉक्टर सुगन बरंठ
देशभरात वेगवेगळ्या राज्यात आज पर्यावरणपूरक व स्पर्धाविहीन शाळा वाढत आहेत. या शाळा नयी तालिम चा दृष्टीकोन स्वीकारत आहेत. शिक्षणात श्रमाला महत्व,परिसराशी शिक्षण जोडणे,मानवी मूल्यांना प्रतिष्ठा हे अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होते आहे असे नयी तालिमसमिति चे राष्ट्रीय अध्यक्ष सुगन बरंठ यांनी सांगितले.याकडे आम्ही एक शाळा म्हणून बघत नसून सर्वोदयी समाजरचना निर्मितीचे साधन म्हणून ही समिति बघते. समिति ची
http://www.naitalimsamiti.org/ वेबसाइट असून http://
www.lokbharti.org व http://puvidham.in/puvidham-learning-centre/ अशा काही शाळा या विचारावर प्रभावी काम करीत आहेत
-----------------------------------------------------------------
नयी तालिम संकल्पनेवर अनेक पुस्तके हिन्दी इंग्रजीत उपलब्ध आहे. शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी वर्धा येथे राहून नयी तालिम:गांधीप्रणित शिक्षणविषयक प्रयोगांचा इतिहास” (डायमंड प्रकाशन) हे ३५० पानांचे पुस्तक या विषयावर मराठीतील महत्वाचे पुस्तक अभ्यासकांना उपयुक्त आहे

Sunday, 27 September 2015

आनंदाने शिकता शिकता.. 

 फिनलँडमधल्या सर्व शाळा शासनच चालवते. तरीदेखील बालवाडी ते संशोधन क्षेत्रापर्यंत सर्वच टप्प्यांवर व्यक्तिमत्त्व घडविण्याची, आपल्या आवडीनुसार पुढे काय करायचे आहे हे शोधण्याची, ठरविण्याची संधी येथे प्रत्येक मुलाला असते. १९७० पासून राबविण्यात येणाऱ्या या पद्घतीने जगासमोर एक आदर्श शिक्षण व्यवस्था उभी केली आहे. कल्पना करा. तुमच्या घरात बाळ जन्माला आले आहे. दवाखान्यातून घरी जाताना शासनातर्फे तुम्हाला एक भेट मिळते. त्यात तीन पुस्तके आहेत- एक आईसाठी, एक वडिलांसाठी तर एक चक्क बाळासाठी! अर्थात बाळाच्या पुस्तकात आई-वडिलांचे चेहरे आहेत. शासन बाळाच्या पालकांना सांगते आहे की तुमच्या माध्यमातूनच हे बाळ बाहेरचे जग पाहणार आहे, तेव्हा तुम्हीच बाळासाठी महत्त्वाचे आहात! हे सारे कल्पनारंजन इथेच संपत नाही. हे बाळ थोडे मोठे झाल्यावर शासनाच्याच बालवाडीत जाते. या बालवाडीत त्याला मुक्त खेळायची, समवयस्क मुलांसोबत मत्री करायची संधी असते. त्याचे औपचारिक शिक्षण वयाच्या सातव्या वर्षांपासून चालू होते, जेव्हा हे मूल शासनाच्या शाळेत पाऊल टाकते. होय, शासनाच्याच, कारण फिनलँडमधल्या सर्व शाळा शासनच चालवते, आणि एकदा का हे मूल शाळेत जायला लागले, की या मुलाला घडवायची, त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी तयार करायची जबाबदारीच शाळेतील शिक्षक स्वीकारतात, आणि मग ते करण्यासाठी योग्य ते मार्ग स्वत:च शोधतात. थांबा, अजूनही बरेच आहे. हे मूल अत्यंत आनंदात, परीक्षांचा ताण नसलेल्या वातावरणात आपले शालेय शिक्षण पूर्ण करते. आपले व्यक्तिमत्त्व घडविण्याची, आपल्या आवडीनुसार पुढे काय करायचे आहे हे शोधण्याची, ठरविण्याची संधी या मुलाला असते. १०व्या वर्षी घेण्यात येणाऱ्या चाचणीच्या आधारे व विद्यार्थ्यांची आवड व क्षमतेनुसार त्याला पुढचे शिक्षण घ्यायची मुभा असते. व्यवसाय प्रशिक्षण व ज्यांना अभ्यास व संशोधनात रस आहे अशांनाच पुढच्या पदवी अभ्यासक्रमाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हे असं खरंच फिनलँडमध्ये आज घडतंय. नव्हे, १९७० पासून आजपर्यंत अशाच पद्धतीने आपल्या मुलांना शिक्षण देऊन फिनलँडने या मुक्त आणि आनंदी अशा शिक्षण व्यवस्थेचे यश सिद्धच केले आहे. शिक्षण व्यवस्थेची घडी बसवताना अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी विचारपूर्वक, चर्चा व चर्वतिचर्वणाद्वारे जनमत तयार करत करत फिनलँडमधल्या आजच्या शिक्षण व्यवस्थेने जन्म घेतला. ह्यची सुरुवात ही दुसऱ्या महायुद्धातील अस्वस्थतेतूनच झाली. संकट नको असले तरी बरेच काही शिकवून जाते, परत उभे राहण्याची जिद्द देते. तसेच काहीसे फिनलँडचे झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा देश ५-६ वष्रे अत्यवस्थ होता. त्या काळी सुमारे ४० लाख लोकसंख्या असलेल्या या छोटय़ाखानी, शेतीप्रधान अर्थसंस्कृती असलेल्या देशातल्या लाखो लोकांना युद्धाची झळ बसली. स्वातंत्र्यासाठी लढावे लागल्यामुळे फिनिश समाज एकत्र आला तो एक नवा आदर्शवाद घेऊनच. सर्वासाठी समान शिक्षणाची संधी ही संकल्पना याच आदर्शाचा एक भाग होती. पुढचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असेल हे जाणून या समाजाने शिक्षणाचे महत्त्व ओळखले व सामाजिक-आíथक विकास साधण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून शिक्षणाला व शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले. अत्यंत वैविध्य असलेल्या देशांतून स्थलांतरित होऊन फिनलँडमध्ये स्थायिक झालेल्या समाजातील मुलांनासुद्धा फिनलँडच्या शाळांनी अत्यंत आनंदाने सामावून घेतले आहे. बऱ्याच शाळांमधून तर निम्मे विद्यार्थी इतर देशांतील असतात. देशाला पुढे जायचे असेल, एक प्रगत राष्ट्र म्हणून जगातील आपले स्थान भक्कम करायचे असेल तर आपल्या नवीन पिढीला उत्तम शिक्षण दिले पाहिजे या मूलभूत संकल्पनेला फिनिश लोकांनी खूप महत्त्व दिले आणि उत्तम शिक्षण म्हणजे आपल्या पायावर समर्थपणे उभे राहाणाऱ्या सक्षम फिनिश नागरिक घडवण्याचे शिक्षण, हेही त्यांनी ठरवून टाकले. त्या काळातली फिनलँडची शिक्षण व्यवस्था अनेक समस्यांनी ग्रस्त होती. कमी पटनोंदणी, प्राथमिक इयत्तेतच शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक, शहरी व श्रीमंत वर्गाला खासगी शाळांतून मिळणारी शिक्षणाची संधी व गरीब जनता मात्र वंचित, औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याला महत्त्व देणारी व शिक्षककेंद्रित शिक्षणपद्धती, अशी आपल्याला ओळखीची व जवळची वाटेल अशीच तिथली शिक्षणव्यवस्था होती. १० पकी ९ फिनिश नागरिक ७ ते ९ वर्षांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकत होते. वय इयत्ता शिक्षणाचे स्वरूप / अभ्यासक्रम ३ ते ६ ०* बालवाडी ७ ते १५ १ ते ९वी सक्तीचे र्सवकष शिक्षण १६ ते १८ १० ते १२ माध्यमिक शिक्षण अथवा व्यावसायिक शिक्षण १९ ते २१ १३ ते १५ पदवी शिक्षण (विद्यापीठ) अथवा व्यावसायिक पदवी शिक्षण २२ ते २३ १६ ते १७ पदव्युत्तर शिक्षण (विद्यापीठ) अथवा व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण २५ ते २६ १९ ते २० संशोधनपर (पीएचडी) विद्यापीठ या व्यवस्थेत आमूलाग्र बदल करायला हवा हे फिनिश शासनाने व नागरिकांनी ओळखले. १९४६ पासूनच फिनिश सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. तेव्हा अस्तित्वात असलेल्या शैक्षणिक रचनेचा मूळ पायाच बदलण्याच्या दृष्टीने विचारांची पावले पडायला लागली. हे करताना फिनिश जनतेने व शासनाने प्रचंड खल केला; तीन महत्त्वाच्या समित्यांनी अभ्यास करून आपल्या शिफारसी मांडल्या, ज्यावर चर्चाचे झोड उठले. विरोधी मते मांडली गेली, टीकेला प्रत्युत्तर दिले गेले. या सर्व प्रक्रियेत केवळ राजकीय नेत्यांनीच नव्हे, तर पालकांपासून शिक्षणतज्ज्ञांनी, शिक्षण क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वानी या चच्रेत भाग घेतला, हिरिरीने आपली मते मांडली. ही प्रक्रिया साधारणत: दोन दशकांच्या वर चालली. हळूहळू काही मुद्दे स्वीकारत, काही नाकारत, प्रत्यक्षात आजची शिक्षणरचना साकारायला फिनलँडला १९७० चे साल उजाडले. एवढा काळ जरी लागला असला तरी ही प्रक्रिया चालू असतानाच त्याचे परिणाम दिसू लागले होते. १९५५-५६ मध्ये ३४,००० असलेली पटनोंदणी पाच वर्षांत दोन लाखांवर गेली होती, तर १९७० पर्यंत ३.२५ लाखपर्यंत पोचत दसपटीने वाढली होती. फिनिश शिक्षण व्यवस्थेचा पाया हा तिची मूल्ये, रचना व शिक्षक प्रशिक्षण या तीन महत्त्वाच्या बाबींवर रचला गेला आहे असे म्हणता येईल. या नवीन रचनेची जी काही मूल्ये ठरवली गेली, ती अशी- सर्वाना शिक्षणाची समान संधी देणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले गेले. खऱ्या अर्थाने सर्वाना शिक्षणाची समान संधी आपण खरंच देऊ शकतो का, ह्य प्रश्नाचे उत्तरही आपल्याला इथेच मिळते. इराक, सोमालिया, रशिया, बांगलादेश, इथिओपिया अशा अत्यंत वैविध्य असलेल्या देशांतून स्थलांतरित होऊन फिनलँडमध्ये स्थायिक झालेल्या समाजातील मुलांनासुद्धा फिनलँडच्या शाळांनी अत्यंत आनंदाने सामावून घेतले आहे. बऱ्याच शाळांमधून तर निम्मे विद्यार्थी इतर देशांतील असतात. खरं म्हणजे स्वत:ची भाषा व संस्कृती याबद्दल फिनिश समाज अत्यंत जागरूक आहे. असे असतानादेखील त्यांनी सर्व स्तरांतील व भाषिक समूहातील मुलांना समान संधी द्यायची ठरवली. वर्गात कुणालाही मागे पडू द्यायचे नाही ह्य निश्चयाने काम करणाऱ्या शिक्षकांसाठी हे तर खूप मोठे आव्हान असते. पण तरीही फिनलँडचे सुमारे ३५०० शिक्षक हे आव्हान समर्थपणे पेलताना दिसतात. शिकण्याची प्रक्रिया ही आयुष्यभर चालूच राहते. हे ओळखून अभ्यासक्रम पूर्ण करण्याऐवजी मुलांना शिकते करण्याला महत्त्व दिले गेले. एवढेच नाही, तर विशेष गरज असलेल्या मुलांनाही त्याच वर्गात प्रवेश दिला जातो. शिकताना येणाऱ्या अडचणी वेळेवर कळल्या तर त्यावर उपाय केले जाऊ शकतात, म्हणून अनेक शाळांमध्ये अशा मुलांसोबत काम करण्याचे प्रशिक्षण असलेले शिक्षक असतात. यापेक्षा अधिक सर्वसमावेशक असे काय असू शकते! भक्कम अभ्यास व संशोधनावर आधारितच धोरण ठरवण्याचे सूत्र अंगीकारायचे असे ठरवण्यात आले. नवीन व्यवस्था ठरवताना अभ्यासांचा (गरज पडल्यास सर्वेक्षणांचाही), अनुभवांचा आधार घेतला गेला. शिक्षणतज्ज्ञांनी आपली मते तर मांडलीच, पण त्यावर बहुमत होईल यासाठीही प्रयत्न झाला. साहजिकच ही नवी घडी बसताना अभ्यास व संशोधन हा व्यवस्थेचा पाया बनला. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेबाबत सर्व निर्णय घेण्याचे काम हे शिक्षणतज्ज्ञांवर सोपवले गेले, राजकीय हस्तक्षेपाला जागा राहिली नाही. प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा. अभ्यासक्रम पूर्ण करणे नव्हे. तर विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधणे हे शैक्षणिक व्यवस्थेचे लक्ष्य असावे हे ठरवले. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो, त्याच्या आवडीनिवडी, शिकण्याची गती वेगळी असते. हे ओळखून सर्वाना एकच पद्धत लागू न करता विद्यार्थ्यांनुसार शिकवण्याची पद्धतसुद्धा बदलणे गरजेचे असते. शिकण्याची प्रक्रिया ही आयुष्यभर चालूच राहते. हे ओळखून अभ्यासक्रम पूर्ण करण्याऐवजी मुलांना शिकते करण्याला महत्त्व दिले गेले. खऱ्या अर्थाने व्यक्तिकेंद्रित शिक्षण घडू लागले. शैक्षणिक धोरणामध्ये शैक्षणिक उद्दिष्टे ठरवणे, शिक्षणप्रक्रियेला महत्त्व देणे व सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे या तिन्ही बाबींचा अंतर्भाव हवा हे निश्चित केले. शिक्षण प्रक्रियेला महत्त्व दिल्याने परीक्षा, चाचण्या या नाकारून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघितले जाऊ लागले. प्रत्येक शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांशी एक नाते जोडता येते, ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक लहानसहान बाबींवर त्याचे लक्ष राहते. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधणे त्यामुळे शक्य होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक पलूवर शिक्षकाला काम करता येते. शिक्षक प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व हवे व त्याकडे एक स्पर्धात्मक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करायला हवा हे मान्य केले गेले. शिक्षक प्रशिक्षण व संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांना असलेले अनन्यसाधारण महत्त्व हे फिनिश शिक्षण व्यवस्थेचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. या बाबतीत फिनलँड जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत वेगळा विचार करताना दिसते. शिक्षकांवर टाकण्यात येणारा विश्वास, त्यांना दिले जाणारे स्वातंत्र्य व पर्यवेक्षणाचा अभाव हे बरेच काही सांगून जाते. फिनिश शाळा शासन चालवत असूनही या शाळांमध्ये पर्यवेक्षण होत नाही ही पटण्यासारखी गोष्ट नाही. पण हेच खरे आहे. असे असूनसुद्धा फिनलँडच्या सर्व शाळांचे विद्यार्थी तेवढेच प्रावीण्य मिळवतात याचे आश्चर्य वाटावे. शिक्षक बनण्यासाठी बरेच फिनिश नागरिक उत्सुक असतात, तरीही दहापकी एकच व्यक्ती शिक्षक बनू शकते. शिक्षक प्रशिक्षण विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा असते. म्हणूनच शिक्षक असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे हे सांगायला नकोच. देशातले हुशार नागरिक या क्षेत्राकडे वळतात यावरूनच तिथली शिक्षण व्यवस्था कशी आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. स्पर्धा नाही! शिकण्याच्या प्रक्रियेत स्पध्रेचा अडसर ठरू शकतो म्हणून स्पध्रेचा विषय फिनलँडने तर संपूर्णपणे निकालात काढला. सतत परीक्षा घेत मुलांची प्रगती मोजणे, शिक्षकांच्या चाचण्या, शाळांसाठी निकष लावणे या सर्व बाबी या देशाने बाद करून टाकल्या. माध्यमिक शाळेच्या अंतिम टप्प्यावर घेतली जाणारी एक चाचणी सोडली तर हे विद्यार्थी कुठलीच परीक्षा देत नाहीत. मुलांची, शाळांची, शिक्षकांची एकमेकांशी ना तुलना केली जाते, की ना स्पर्धा लावली जाते. तुझा नंबर कितवा हा प्रश्न विचारायची वेळच इथल्या विद्यार्थ्यांवर येत नाही! प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या आवडीनुसार त्याचे कामाचे क्षेत्र निवडता यावे म्हणून व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन या दोन्हींना अभ्यासक्रमातच समाविष्ट करून घेण्यात आले. सक्तीचे शिक्षण पूर्ण करण्याच्या कालावधीतच मुलांना आपले पुढील शैक्षणिक उद्दिष्ट ठरवता यावे यासाठी या दोन्हींना अत्यंत महत्त्व आहे. बेसिक शिक्षण झाल्यानंतर मुलांपुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे, व्यावसायिक प्रशिक्षण घेणे किंवा काम शोधणे असे तीन पर्याय असतात. किती शिकायचे हा पर्याय मुलांना लवकर दिल्याने ज्यांना अभ्यासात रस नाही त्यांच्यावर शिकत राहण्याचा व त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना त्यांना शिकवत राहण्याचा ताण येत नाही. पर्यायाने गळती पण होत नाही. ‘आम्ही एवढे चांगले काम करतो?’ आपण किती उत्तम काम करत आहोत हे फिनलँडमध्ये कुणालाच माहीत नव्हते. जेव्हा २००० साली आंतरराष्ट्रीय पातळीवरची पिसा चाचणी पहिल्यांदा घेतली गेली तेव्हा व नंतरच्या २००३, २००६, २००९ मध्ये घेतल्या गेलेल्या चाचणीत फिनलँड देशातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तम यशाने जगाचे लक्ष वेधून घेतले. फिनलँडच्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण तर मिळालेच, पण इतर देशांच्या तुलनेत या देशातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादित केले. पिसाच्या वाचन, गणित व विज्ञान या तिन्ही चाचण्यांत बहुतांश फिनलँडच्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळाले. एवढेच नाही, तर या देशातील सर्व शाळांचे विद्यार्थी या चाचणीत तितकेच यशस्वी झाले. शिक्षक बनण्यासाठी बरेच फिनिश नागरिक उत्सुक असतात, तरीही दहापकी एकच व्यक्ती शिक्षक बनू शकते. शिक्षक प्रशिक्षण विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा असते. म्हणूनच शिक्षक असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. अचानक जगातील शिक्षणतज्ज्ञांचे लक्ष फिनलँडकडे वेधले गेले, आणि त्यानंतर फिनलँडच्या शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास सुरू झाला. आकडेवारी तपासली गेली, अनेक लेख, शोधनिबंध लिहिले गेले. फिनलँडच्या शाळांना, तिथल्या नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन या शिक्षणाचे धोरण ठरवणाऱ्या शासकीय संस्थेला अक्षरश: हजारो लोकांनी भेटी दिल्या. इतक्या की फिनलँड देश हा शिक्षण क्षेत्रातील एक पर्यटन स्थळ बनला! फिनलँडच्या शासनाने तर चक्क आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल इतर देशांना माहिती देण्यासाठी एका दूताची नेमणूक केली. फिनलँड देश हा भारतातील एका मोठय़ा शहराएवढा देश आहे. पुणे शहरापेक्षा थोडा मोठा. ५२.४ लाख लोकसंख्येच्या या देशात ३७०० शाळांमधून ४४,४३३ शिक्षक शिकवतात. मात्र गुणवत्तेबाबत या सर्व शाळांची कामगिरी तेवढीच मोठी आहे. ९३% विद्यार्थी फिनिश शाळांतून आपले पायाभूत वा व्यावसायिक शिक्षण पूर्ण करतात, तर जवळ जवळ ६६% विद्यार्थी पदवीच्या शिक्षणाकडे वळतात. सर्व स्तरांवरचे शिक्षण शासन मोफत पुरवत असले तरी अमेरिकेच्या तुलनेत प्रत्येक विद्यार्थ्यांप्रती होणारा खर्च कमीच आहे. हे आकडे खूप बोलके आहेत. हेलसिन्कीच्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका, अर्जारिता हेक्किनेन या शिक्षिकेचे मत बोलके होते. ती म्हणाली, ‘‘मला अजूनही आश्चर्य वाटते. आम्ही इतके चांगले काम करत होतो हे आमच्या लक्षातच नाही आले!’’ आमच्या तर अजूनही हे लक्षात आलेले नाही. आपल्याकडे शिक्षण ही राज्याच्या यादीतली बाब आहे व जिल्हा पातळीवर, शहर पातळीवर शिक्षण मंडळांच्या आधिपत्याखाली आपली शिक्षण व्यवस्था येते. या मंडळांना कायद्याने खूप स्वातंत्र्य दिले असतानाही जगातील सर्वोत्तम शिक्षण व्यवस्थेकडून आपण काही धडे घेत नाही. आपल्याकडेही अनेक शिक्षणतज्ज्ञ आहेत, अनेक प्रयोग होत आहेत, पण प्रत्यक्षात निर्णय घेताना मात्र शिक्षणशास्त्राचा आधार घेतला जात नाही. ते तर जाऊ द्या. भावी पिढीचे शिक्षण हे तर आपल्यासाठी क्षुल्लक बाब आहे. मुलांना लागणारी मोकळी मदाने, मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळांच्या इमारती या आपल्यासाठी बाजारी वस्तू आहेत.